10 मे 2010

मराठी !!! विचार करा !

इंटरनेट वर फिरताना काही मराठी बाबतच्या माहिती मिळाल्या ! त्या आपल्यासमोर एकत्र  ठेवतो


हिंदी हि राष्ट्रभाषा : एक चकवा (लेखक सलील कुलकर्णी) यातील काही ठळक गोष्टी


>भारताच्या घटनेमध्ये कुठल्याही भाषेचा उल्लेख ‘राष्ट्रभाषा’ असा कलेला नाही . उलट घटनेच्या अनुसूची-८   मध्ये  सर्वच भाषा या राष्ट्रभाषे समान दर्जाच्या मानल्या जाव्यात असा संकेत दिला गेला आहे.

>कोटय़धीश मारवाड ,रिक्षा  ओढणारे बहार व कारकनी करणारे बंगाली हे सार्वजण आपापसात सहजपणे बंगालीतच बोलताना दिसतात.

>पंजाबी भाषा बोलतात कवा गुजराथी बोलतात किंवा  मल्याळम. परंतु तरीही
यामुळे आपल्यापैकी कुणाचेही भारतीयत्वा कुटल्याही दृष्टीने कमी प्रतीचे ठरत नाही.

>१. केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाचे मूळ हिंदी पत्र:

http://amrutmanthan.files.wordpress.com/2010/01/e0a485e0a4aee0a583e0a4a4e0a4aee0a482e0a4a5e0a4a8-
e0a5a7_e0a4b9e0a4bfe0a482e0a4a6e0a580-e0a4b0e0a4bee0a4b7e0a58de0a49fe0a58de0a4b01.pdf

..................................................

मराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे – कमल हासन (वृत्त: दै० डीएनए, ९ मे २०१०)

“मराठी संस्कृती ही तमिळ संस्कृतीप्रमाणेच प्राचीन आणि महान आहे. शिवाय (लोकसंख्येने) ते एक मोठे राज्य आहे. (अशा परिस्थितीत) त्यांनी आपल्या संस्कृतीच्या बाबतीत हिंदी चित्रपटांपुढे गुढघे टेकून पूर्णपणे हार मानली आहे ही खरोखरच खेदजनक गोष्ट आहे. तमिळ लोकांमध्ये असलेला स्वभाषेबद्दलचा अभिमान मराठी लोकांमध्ये का नाही ह्याचे कारणच मला समजत नाही.” मराठी चित्रपटात अभिनय करण्याची इच्छा व्यक्त करताना हल्लीच कमल हासन ह्या लोकप्रिय तमिळ चित्रपट अभिनेत्याने वरीलप्रमाणे उद्गार काढले.



...................................................................................

महाराष्ट्रात निपाणी नाही, परंतु निपाणीत महाराष्ट्र (वृत्त: दै० लोकसत्ता १९ एप्रिल २०१०)

“येथील मराठी माणसांच्या बोलण्यात, व्यवहारात, शिक्षण क्षेत्रात मराठी भाषेला अव्वल स्थान दिल्याने येथे कन्नडची भेसळ नाही. अगदी शंभर टक्के मराठी अस्मिता आणि मराठी बाणा.”


....................................................................................
...........................................................................................................................

‘हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा!!’ – वाचकांच्या प्रतिक्रिया (दै० लोकसत्ता, २९ नोव्हें० २००९)

“कायद्याने नेमून दिलेले आणि इतर राज्यभाषांना दिले जाणारे सर्व कायदेशीर अधिकार, मान, महत्त्व आमच्या मराठी भाषेला द्यायलाच पाहिजेत-त्याहून जास्त नको; पण किंचितही कमी नको. हे म्हणणं अयोग्य, बेकायदेशीर, अनैतिक म्हणता येईल का?”
या संबंधी एक अभ्यासपूर्ण लेख १५ नोव्हेंबरच्या लोकमुद्रामध्ये सलील कुलकर्णी यांनी लिहिला होता. या लेखावर देशा-परदेशातून अनेक प्रतिक्रिया आल्या. जागेअभावी या सगळ्या  प्रतिक्रिया छापता येणं तर अशक्यच आहे, पण सर्व पत्रलेखकांची नावंही छापणं अशक्य आहे.  त्यामुळे काही निवडक प्रतिक्रियाच येथे देत आहोत. (लोकसत्ता, लोकमुद्रा, २९ नोव्हेंबर २००९)

...................................................................................

महाराष्ट्र शासनाचे गुजराथीला १ कोटी आणि मराठीला २५ लाख? (वृत्त: दै० महाराष्ट्र टाईम्स, मुंबई, दि० ३ डिसें० २००९)

दिनांक ३ डिसेंबर २००९च्या महाराष्ट्र टाईम्समधील बातमीवरून असे कळते की नेहमीच ’माय मरो आणि मावशी जगो’ असे धोरण पाळणारे आपले महाराष्ट्र राज्यशासन मराठी साहित्य सम्मेलनास २५ लाखाचे अनुदान देत असे; पण गुजरात साहित्य अकादमीस मात्र ३५ लाख देत असे. आणि आता आयजीच्या जिवावर बायजी उदार होऊन गु०सा०अ०ची अनुदानाची रक्कम वाढवून तिला तब्बल १ कोटीचे अनुदान देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. याला काय म्हणावे? शब्दच सुचत नाहीत. %@&#%#**…. !!!

............................................................................................





23 एप्रि 2010

पाहिलं लेखन: क्रिकेट

बर्याच दिवसांनी वेळ मिळाला ! लिहायला

सध्या आय.पी.एल चालू आहे म्हणून जरा क्रिकेट बद्दल आणि त्यातील खेळाडूंबद्दल जरा थोडे माझे विचार....

एकेरी / दुहेरी पहावे तर धोनीचे....

चौकार असावे तर द्रविडचे.....

षटकार असावे तर युवराजचे....

नजर असावी तर झहीरची.....

समोरच्याला वेडा करावे तर कुंबळेने....

सातत्य असावे तर गंभीरचे....

भीती असावी तर सेहवागची....

फिरकी असावी तर हरभजनची....

आणि ......

खेळ असावा तो सचिनचा......


आपले विचार तर बिनधास्त लिहा....

नवीन खेळाडूं बद्दल लिहा...